कार्याचा आढावा

नमस्कार,

मी राहुल भगवानराव जाधव, पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २ भारतीय जनता पक्ष (भाजप) चा उपाध्यक्ष, लहानपणापासून समाजसेवेची प्रेरणा मला माझे वडील, माजी नगरसेवक श्री. भगवानराव जाधव यांच्याकडून मिळाली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी कार्यरत आहे. णेशोत्सव, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि युवकांसाठी क्रीडा व सामाजिक उपक्रम यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक उपक्रमात माझा उद्देश फक्त काम पूर्ण करणे नाही, तर समाजाशी घनिष्ठ नाते निर्माण करणे हा आहे.

माझा विश्वास आहे की एकत्रित प्रयत्नांमुळेच खरा विकास घडतो. “कार्याचा आढावा” घेताना मला अभिमान आहे की आमच्या प्रयत्नांमुळे प्रभागातील अनेक बदल आणि सकारात्मक परिणाम घडले आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाय करणे हे माझे मुख्य ध्येय राहिले आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनता केंद्रित दृष्टिकोन हे माझ्या कार्याचे तत्त्व आहे. युवकांना समाजकार्यात सहभागी करून घेणे आणि त्यांना योग्य दिशा देणे हे माझे ध्येय आहे. प्रभागातील नागरिकांच्या पाठिंब्यामुळे मी प्रत्येक निर्णय आणि उपक्रमात दृढ राहू शकतो.

“जनतेसाठी समर्पित, विकासासाठी कटिबद्ध”

गरीब रुग्णांच्या डोळ्यांतली असहाय्यता पाहिली तेव्हा ठरवलं –

“आरोग्य ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे, ती कोणत्याही परिस्थितीत नाकारली जाऊ नये.”

मी असंख्य मोफत आरोग्य शिबिरं घेतली, स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या मांडल्या आणि बालकांच्या पोषणासाठी जनजागृती मोहिमा राबवल्या.आजही माझं ध्येय आहे की प्रत्येक नागरिकाला योग्य उपचार, योग्य सुविधा आणि आरोग्याचा हक्क मिळावा.

आरोग्य क्षेत्र

वंचित समाजातील एका मुलाच्या हातात पुस्तक दिसलं की माझ्या मनात प्रचंड आशा जागते. कारण ज्ञान हीच खरी ताकद आहे. माझ्या कार्यातून मी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन दिलं आहे. खेळ आणि संस्कृती ही जीवन समृद्ध करणारी साधनं आहेत – म्हणूनच मी युवकांना केवळ अभ्यासापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं आहे.

शिक्षण व युवक विकास

समाजातील प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीची वेदना माझ्या हृदयाला भिडते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि न्याय मिळवून देणं हीच माझी खरी जबाबदारी आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी रोजगार प्रशिक्षण, युवकांना सक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास आणि पर्यावरणासाठी वृक्षारोपण – हे माझ्या प्रवासातील अविभाज्य टप्पे आहेत. मी नेहमीच विश्वास ठेवतो की समाजाचा बदल हा रस्त्यावरच्या संघर्षातून आणि एकजुटीतूनच घडतो.

सामाजिक उपक्रम

समाजसेवेचे काम करताना मला नागरिकांच्या डोळ्यांत अपेक्षा दिसल्या

“कोणी तरी आमचं ऐकावं, आमच्यासाठी उभं राहावं.”

झोपडपट्टी पुनर्वसन, पायाभूत सुविधा, पाणी, वीज, रस्ते – हे फक्त विकासाचे मुद्दे नाहीत, तर हजारो कुटुंबांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी झटतोय आणि झटत राहीन. लोकशाही ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर लोकांशी सतत संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवणं हाच तिचा खरा आत्मा आहे. तो आत्मा जिवंत ठेवण्यासाठी माझं जीवन झटत राहील.

राजकीय कार्य

“विकास म्हणजे केवळ रस्ते वा इमारती नव्हेत; विकास म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यातला सकारात्मक बदल.”